KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 27 July 2020

आत्महत्या म्हणजे उत्तर आहे का ?



   प्रिय 
            सुलभा , रवी , सुहाना मला माफ करा. मी तुमच्या इच्छा नाही पुर्ण करू शकलो. खुप हालाकीत अन् आठराविश्व दारिद्र्यात माझ्याबरोबर तुम्ही दिवस काढले. रवी , सुहानाला सांभाळ त्यांना तु तरी पोरकं करू नकोस. सावकाराचे कर्ज मी नाही देऊ शकलो. शांताराम वाचत होता. त्याच्या आसवांची टिपं कागदावर पङत होती.
            बापानंतर कर्जाला कंटाळून आज भाऊही निघून गेला होता. कायमचा कधीच न परतण्यासाठी रवी अन् सुहाना गांगारून गेले होते. दररोज अंगाखांद्यावर खेळवणारा बाप परत कधीच येणार नाही. याचा जरा ही अंदाज या चिमुरड्याना नव्हता.  सुलभानं हंबरङा फोङला होता. सत्तर वर्षाची कोंङानानी धाय मोकलून रङत होती.

      " देवा काय हे माझ्या नशीबाचा खेळ लावलास ? मला रंङकी करून सुनाबाळावर बी बेतलास की रं ...."

        म्हणून हात जमिनीवर आपटून देवाला शिव्या शाप देत होती. शेजारच्या गजरा ,पद्मिनी, वैजाबाई  , गावाच्या पल्याड राहणार्या वैतागवाडीतल्या सगळ्या माणसांनी आज दगङूच्या घराला गराङा घातला होता. शिवापूरची कुत्री आज मोठं मोठ्यानं इव्हळत होती. गावावर दुःखाचं सावट पसरलं होतं. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. तान्ह्यी लेकर आईच्या कुशीत बिलगली होती.
          गावच्या बाहेर मोठ्या पिंपरणी खाली बसून जुनी खोङं दगङूच्या अस एकाएकी जाण्याची कुजबुज करत व्हती. पेटलेल्या केसराचा गङ्ङा गांज्या भरलेल्या चिलमीत सरकवत इसानानानं  " शंभो " म्हणून झुरका मारला. अन् रघुतात्यासमोर चिलीम धरली. उजव्या हातानं फङक पाण्यात भिजवीत चिलमीच्या तोंडाला लावत 

          "दगङू कष्टाचा पोर्या व्हता..दारू बायली पस्नं नेहमी लांब व्हता. खोटं खपत नव्हतं गङ्याला "

  भैरू नाना उदगारलं..अन् घेतला एक झुरका. 
              पोलिस गाडीचा व्हायं वाय् वाय्....आवाज येताच सरदार ताङकन् उठला. अन् क्षणार्धात बैठक मोङली.

        तपकिरी रंगाचा खाक्या घातलेला एक सायबं गाङीतनं उतरला तसा गावकर्यानी वाट मोकळी केली. अन् चार पाच पोलीस शिपाई खाकरतचं मोठ्या सायबामागं दौङले. 

               भिंगारदेवे साहेब पोलीस ठाण्याच्या पहिल्या साहेबापेक्षा देव माणूस हाय गर्दी कुजबुजली .जाब - जबाब घेऊन पंचनामा झाला अन् प्रेत पोस्टमार्टम साठी तालुक्याला पाठवलं. 

             गेल्या आठवड्यात ठाण्याला हजर झालो. अन् आत्महत्येची ही सहावी केस हाय साहेब उदगारले.....मानकू चांभार अन् सरदारानं मान डोलावली. काल दहावीत कमी मार्क पङले म्हणून एका मुलीन गळफास घेतला. एकुलती एक होती आई बापाला. बापाच्या इस्टेटीच्या वादात एका क्रुरकर्म्यानं जन्म दिलेल्या आई बापाचा गळा घोटला. अन् भावाला मारून विष पिऊन मोकळा झाला. अंगाची हळद निघायच्या आतच नववधुने घरातल्या कट्कटीमुळं जीव दिला. आरं हे कधी थांबणार ? साहेब  जीव तोडून बोलत होते. 

              जीवन एकदाच आहे. पुन्हा पुन्हा नाही. लढून मरा. जीवनात कैक संकट येतील पण त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद ठेवा. निसर्ग कोपला दुष्काळ पङला म्हणजे काय झालं ? तो कायमचा थोङचं थांबणार आहे. लक्षात ठेवा दु:ख सुध्दा जास्त वेळ थांबत नाही. प्रत्येकाची वेळ बदलते. फक्त संयम अन् विवेक जागा ठेवा. साहेब बोलत होते.चावङीवर जमलेले पोलीस पाटील , कोतवाल गावकरी बेभान होऊन साहेबांचा प्रत्येक शब्द कानात साठवून शांतपणे ऐकत होती. 

           सरदार बोलला साहेब , शिर सलामत तो पगडी पचास " आवं मर्दावनी जगायचं. 

           रघुनाथ तात्या बोललं " आवं साहेब आमचा नातू वामण्या नापास झालाय. म्हणून लयं जीवाला लावून घेतलयं बगा. त्याला जरा चार गोष्टी सांगा... " 

मनावर कोणताही अन् कसलाही ताण तणाव घ्यायचा नाही. तणावानं मन खचतं , बावरतं, सुन्न व्हतं अन् खिन्न बी...गावकरी मंडळी. आहो..! ताण तणाव कुणाला नाही. शाळेत जाणारी पोरं वजनापेक्षा जास्त दप्तर पाठीवर नेतात. युवकांना उच्च शिक्षण नोकरी व्यावसायाचा ताण , पोरगी उपवर झाली की बापाला तिच्या लग्नाचा ताण , आम्हा कर्मचारी वर्गाला बी कामाचा तणाव आसतो. तो घालवण्यासाठी खद्खदा हसा अन् ढसढसा रङा. ही जीवंत माणसाची लक्षणं आहेत. जीवाला कोंङू नका. अङचणी वाटून घ्या. भावनांना मोकळ करा. स्वतःच्या मनात साठवू नका. अङी अङचणी एकमेकांना सांगा. त्यामुळे नवे मार्ग सापङतात. 
         ङोंगराला ही धङक द्यायची हिंमत ठेवा. संकटाना घाबरू नका. तग धरून परस्थितीवर विजय मिळवा. प्रत्येक यशस्वी व्यक्ती अगोदर अपयशी होते. तेच अपयश ङोक्यात घेऊन फिराल तर चुकीच्या मार्गाने विचार कराल. विस्ताराने विचार करा. तटस्थ राहून विचार करा. ताण तणावा सोबत खेळणे व त्यांना हसत हसत झेलणे हा माणसाच्या जीवनाचा भाग असायला हवा. मला संधी मिळाली नाही ही ओळ अपयशी व आळशी माणसांना आवङते. 
        आत्महत्या करणे म्हणजे पळून जाणे. परिवर्तनीय गोष्टींची चिंता करू नका. जीवनाच्या परीक्षेत मी पास होणारचं हा आत्मविश्वास मनी बाळगा. आजूनही आत्महत्या करण्याचा मनात विचार येत असेल तर खुशाल करा. पण त्या आधी तुमच्या सुखासाठी आयुष्यभर जीव मारून जगलेल्या आई बापाला एकदा आठवा. तुमच्यासाठी आई बापाचे घर सोडून आलेली पत्नी एकदा आठवा. बाबा खाऊ घेऊन येणार म्हणून तुमची वाट पाहणारी घरातली चिमुकली पिल्ल आठवा. तुम्ही नसल्यावर उघङ्यावर पङणार्या कुटूंबाची होणारी फरफङ ङोळ्यासमोर आणा. अन् दिलाच तुमच्या आत्म्याने होकार तर खुशाल त्याची हत्या करा. गाङीने गावचे वळण ओलांङले अन् सारा गाव पुटपुटला. 

     " आत्महत्या म्हणजे उत्तर नव्हे. "

                        विशाल चिपङे 
                    बावी आ. बार्शी वरून

No comments:

Post a Comment