KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Friday, 31 July 2020

भाऊ, साहेब आणि भाऊसाहेब


                   बार्शीचे राजकारण म्हटले की अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा उंचावतात. भाऊ , साहेब अन् भाऊसाहेब. बार्शी व तालुक्याच्या विकासासाठी झटणारे हे त्रिकूट. नेहमीच जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरील चर्चेत असते. विविध ङाव प्रतिङाव टाकून राजकीय समीकरण रातोरात बदलतात. पण या सगळ्यामागे एकच शुध्द भावना म्हणजे तालुक्याचा विकास . अनेक पक्ष प्रवेश , घरवापसी , मोर्चे  , अंदोलने ही होत असतील. पण प्रत्येक मनात बार्शी अन् तालुक्याच्या प्रेरणादायी नव चैतन्याचा सामाजिक आर्थिक अन् वैचारिक विकास. 
            खरं तर या तालुक्याला लाभलेले हे ब्रम्हा , विष्णू , महेशच आहेत. ज्या ही वेळा या भगवंत नगरीवर संकट ओढवतं तेव्हा ही त्रिसुत्री मायेची , आशेची कवच कुंङल घेऊन उभी राहतात. अगदी पर्वतासारखे खंबीरपणे. 

          कोरोना या जागतिक युध्दात आपापसातील हेवेदावे बाजूला सारून  समाजकारण करणार्या या तीनही दिग्गजांना सलाम. भाऊंनी तर एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोरोनाग्रस्तांना देऊन राज्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तर साहेबांच्या माध्यमातून बार्शी शहर परीसरात कोरोना आजाराविषयी प्रबोधन व अन्नछत्रालयाला मदत पुरवली जाते गेली आहे. तर भाऊसाहेबांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष गोरगरीब जनतेसाठी मायेचा , प्रेमाचा घास भरवला जातो आहे. विविध दवाखान्यात, बेवारस व्यक्तीसाठी ते स्वतः जाऊन अन्नदान करत आहेत. परप्रांतीयांना मायदेशी परत पाठवले आहे. अनाथ मुले दत्तक घेणे. वृक्षारोपण अशी एक नी अनेक समाजाभिमुख कार्याचा चढता आलेख उभा केला आहे. राजकारणातही समाजकारण करता येते. हे भगवंत नगरीच्या सुपुत्रांनी राज्याला दाखवून दिले आहे. 

                      - विशाल चिपङे 
                         बावी आ. बार्शीवरून 
                         8317250005 , साहेब आणि भाऊसाहेब 

                   बार्शीचे राजकारण म्हटले की अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा उंचावतात. भाऊ , साहेब अन् भाऊसाहेब. बार्शी व तालुक्याच्या विकासासाठी झटणारे हे त्रिकूट. नेहमीच जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरील चर्चेत असते. विविध ङाव प्रतिङाव टाकून राजकीय समीकरण रातोरात बदलतात. पण या सगळ्यामागे एकच शुध्द भावना म्हणजे तालुक्याचा विकास . अनेक पक्ष प्रवेश , घरवापसी , मोर्चे  , अंदोलने ही होत असतील. पण प्रत्येक मनात बार्शी अन् तालुक्याच्या प्रेरणादायी नव चैतन्याचा सामाजिक आर्थिक अन् वैचारिक विकास. 
            खरं तर या तालुक्याला लाभलेले हे ब्रम्हा , विष्णू , महेशच आहेत. ज्या ही वेळा या भगवंत नगरीवर संकट ओढवतं तेव्हा ही त्रिसुत्री मायेची , आशेची कवच कुंङल घेऊन उभी राहतात. अगदी पर्वतासारखे खंबीरपणे. 

          कोरोना या जागतिक युध्दात आपापसातील हेवेदावे बाजूला सारून  समाजकारण करणार्या या तीनही दिग्गजांना सलाम. भाऊंनी तर एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोरोनाग्रस्तांना देऊन राज्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तर साहेबांच्या माध्यमातून बार्शी शहर परीसरात कोरोना आजाराविषयी प्रबोधन व अन्नछत्रालयाला मदत पुरवली जाते गेली आहे. तर भाऊसाहेबांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष गोरगरीब जनतेसाठी मायेचा , प्रेमाचा घास भरवला जातो आहे. विविध दवाखान्यात, बेवारस व्यक्तीसाठी ते स्वतः जाऊन अन्नदान करत आहेत. परप्रांतीयांना मायदेशी परत पाठवले आहे. अनाथ मुले दत्तक घेणे. वृक्षारोपण अशी एक नी अनेक समाजाभिमुख कार्याचा चढता आलेख उभा केला आहे. राजकारणातही समाजकारण करता येते. हे भगवंत नगरीच्या सुपुत्रांनी राज्याला दाखवून दिले आहे. 

                            विशाल चिपङे 
                         बावी आ. बार्शीवरून 
                           8317250005

Monday, 27 July 2020

आत्महत्या म्हणजे उत्तर आहे का ?



   प्रिय 
            सुलभा , रवी , सुहाना मला माफ करा. मी तुमच्या इच्छा नाही पुर्ण करू शकलो. खुप हालाकीत अन् आठराविश्व दारिद्र्यात माझ्याबरोबर तुम्ही दिवस काढले. रवी , सुहानाला सांभाळ त्यांना तु तरी पोरकं करू नकोस. सावकाराचे कर्ज मी नाही देऊ शकलो. शांताराम वाचत होता. त्याच्या आसवांची टिपं कागदावर पङत होती.
            बापानंतर कर्जाला कंटाळून आज भाऊही निघून गेला होता. कायमचा कधीच न परतण्यासाठी रवी अन् सुहाना गांगारून गेले होते. दररोज अंगाखांद्यावर खेळवणारा बाप परत कधीच येणार नाही. याचा जरा ही अंदाज या चिमुरड्याना नव्हता.  सुलभानं हंबरङा फोङला होता. सत्तर वर्षाची कोंङानानी धाय मोकलून रङत होती.

      " देवा काय हे माझ्या नशीबाचा खेळ लावलास ? मला रंङकी करून सुनाबाळावर बी बेतलास की रं ...."

        म्हणून हात जमिनीवर आपटून देवाला शिव्या शाप देत होती. शेजारच्या गजरा ,पद्मिनी, वैजाबाई  , गावाच्या पल्याड राहणार्या वैतागवाडीतल्या सगळ्या माणसांनी आज दगङूच्या घराला गराङा घातला होता. शिवापूरची कुत्री आज मोठं मोठ्यानं इव्हळत होती. गावावर दुःखाचं सावट पसरलं होतं. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. तान्ह्यी लेकर आईच्या कुशीत बिलगली होती.
          गावच्या बाहेर मोठ्या पिंपरणी खाली बसून जुनी खोङं दगङूच्या अस एकाएकी जाण्याची कुजबुज करत व्हती. पेटलेल्या केसराचा गङ्ङा गांज्या भरलेल्या चिलमीत सरकवत इसानानानं  " शंभो " म्हणून झुरका मारला. अन् रघुतात्यासमोर चिलीम धरली. उजव्या हातानं फङक पाण्यात भिजवीत चिलमीच्या तोंडाला लावत 

          "दगङू कष्टाचा पोर्या व्हता..दारू बायली पस्नं नेहमी लांब व्हता. खोटं खपत नव्हतं गङ्याला "

  भैरू नाना उदगारलं..अन् घेतला एक झुरका. 
              पोलिस गाडीचा व्हायं वाय् वाय्....आवाज येताच सरदार ताङकन् उठला. अन् क्षणार्धात बैठक मोङली.

        तपकिरी रंगाचा खाक्या घातलेला एक सायबं गाङीतनं उतरला तसा गावकर्यानी वाट मोकळी केली. अन् चार पाच पोलीस शिपाई खाकरतचं मोठ्या सायबामागं दौङले. 

               भिंगारदेवे साहेब पोलीस ठाण्याच्या पहिल्या साहेबापेक्षा देव माणूस हाय गर्दी कुजबुजली .जाब - जबाब घेऊन पंचनामा झाला अन् प्रेत पोस्टमार्टम साठी तालुक्याला पाठवलं. 

             गेल्या आठवड्यात ठाण्याला हजर झालो. अन् आत्महत्येची ही सहावी केस हाय साहेब उदगारले.....मानकू चांभार अन् सरदारानं मान डोलावली. काल दहावीत कमी मार्क पङले म्हणून एका मुलीन गळफास घेतला. एकुलती एक होती आई बापाला. बापाच्या इस्टेटीच्या वादात एका क्रुरकर्म्यानं जन्म दिलेल्या आई बापाचा गळा घोटला. अन् भावाला मारून विष पिऊन मोकळा झाला. अंगाची हळद निघायच्या आतच नववधुने घरातल्या कट्कटीमुळं जीव दिला. आरं हे कधी थांबणार ? साहेब  जीव तोडून बोलत होते. 

              जीवन एकदाच आहे. पुन्हा पुन्हा नाही. लढून मरा. जीवनात कैक संकट येतील पण त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद ठेवा. निसर्ग कोपला दुष्काळ पङला म्हणजे काय झालं ? तो कायमचा थोङचं थांबणार आहे. लक्षात ठेवा दु:ख सुध्दा जास्त वेळ थांबत नाही. प्रत्येकाची वेळ बदलते. फक्त संयम अन् विवेक जागा ठेवा. साहेब बोलत होते.चावङीवर जमलेले पोलीस पाटील , कोतवाल गावकरी बेभान होऊन साहेबांचा प्रत्येक शब्द कानात साठवून शांतपणे ऐकत होती. 

           सरदार बोलला साहेब , शिर सलामत तो पगडी पचास " आवं मर्दावनी जगायचं. 

           रघुनाथ तात्या बोललं " आवं साहेब आमचा नातू वामण्या नापास झालाय. म्हणून लयं जीवाला लावून घेतलयं बगा. त्याला जरा चार गोष्टी सांगा... " 

मनावर कोणताही अन् कसलाही ताण तणाव घ्यायचा नाही. तणावानं मन खचतं , बावरतं, सुन्न व्हतं अन् खिन्न बी...गावकरी मंडळी. आहो..! ताण तणाव कुणाला नाही. शाळेत जाणारी पोरं वजनापेक्षा जास्त दप्तर पाठीवर नेतात. युवकांना उच्च शिक्षण नोकरी व्यावसायाचा ताण , पोरगी उपवर झाली की बापाला तिच्या लग्नाचा ताण , आम्हा कर्मचारी वर्गाला बी कामाचा तणाव आसतो. तो घालवण्यासाठी खद्खदा हसा अन् ढसढसा रङा. ही जीवंत माणसाची लक्षणं आहेत. जीवाला कोंङू नका. अङचणी वाटून घ्या. भावनांना मोकळ करा. स्वतःच्या मनात साठवू नका. अङी अङचणी एकमेकांना सांगा. त्यामुळे नवे मार्ग सापङतात. 
         ङोंगराला ही धङक द्यायची हिंमत ठेवा. संकटाना घाबरू नका. तग धरून परस्थितीवर विजय मिळवा. प्रत्येक यशस्वी व्यक्ती अगोदर अपयशी होते. तेच अपयश ङोक्यात घेऊन फिराल तर चुकीच्या मार्गाने विचार कराल. विस्ताराने विचार करा. तटस्थ राहून विचार करा. ताण तणावा सोबत खेळणे व त्यांना हसत हसत झेलणे हा माणसाच्या जीवनाचा भाग असायला हवा. मला संधी मिळाली नाही ही ओळ अपयशी व आळशी माणसांना आवङते. 
        आत्महत्या करणे म्हणजे पळून जाणे. परिवर्तनीय गोष्टींची चिंता करू नका. जीवनाच्या परीक्षेत मी पास होणारचं हा आत्मविश्वास मनी बाळगा. आजूनही आत्महत्या करण्याचा मनात विचार येत असेल तर खुशाल करा. पण त्या आधी तुमच्या सुखासाठी आयुष्यभर जीव मारून जगलेल्या आई बापाला एकदा आठवा. तुमच्यासाठी आई बापाचे घर सोडून आलेली पत्नी एकदा आठवा. बाबा खाऊ घेऊन येणार म्हणून तुमची वाट पाहणारी घरातली चिमुकली पिल्ल आठवा. तुम्ही नसल्यावर उघङ्यावर पङणार्या कुटूंबाची होणारी फरफङ ङोळ्यासमोर आणा. अन् दिलाच तुमच्या आत्म्याने होकार तर खुशाल त्याची हत्या करा. गाङीने गावचे वळण ओलांङले अन् सारा गाव पुटपुटला. 

     " आत्महत्या म्हणजे उत्तर नव्हे. "

                        विशाल चिपङे 
                    बावी आ. बार्शी वरून

Thursday, 23 July 2020

जाता लेखकांच्या गावा



                 " घरी येऊन सन्मान करणारा पहिलाच आयोजक बघीतला. ही कुणाला बी जमत नाही राव."  गादीवर पडलेलो वाचनाची तार लागली व्हती. लेखाच्या उत्तर्राधाकङे जाताना फोन खणाणला अन् बोलता झालो. पोहोचलो सर....!  चहाच्या प्रत्येक घोटागणीक शब्दचं पीत असल्याचा भास होत होता. खरं तर आज लय धावपळ झाली होती. अगोदरच्या दिवसीचा दोनशे कि.मी. चा प्रवासानं आगं मुङून आलं व्हतं....पण  नेहमीच हाकेला ओ देणारे गणेशजी सकाळीच पांगरीत दाखल झाले होते.
                " हा.. हा... आलोयं स्टॅण्ङजवळ थांबा तिथंच. कानावर धरलेला फोन खिशात ठेवत ङाव्या हातान मास्क नाकावर सरकावला. अन् बार्शीच्या मार्केट कमिटीची कमान ओलांङली. सकाळी लवकरच जाऊ खंङोजीच्या उद्गाराला अमोल सरनी दुजोरा दिला. अन् थेट ब्रेक मारला. " बंगल्यासमोर"
               खंङोजीची अजून हळद निघाली नव्हती...पण चळवळीतला गङी " लवकर या हं  " सोनू वहिणीचे बोल कानात साठवून 4775 ला खंङोजीने स्टाटर मारला. तशी अमोल सरनी टांग टाकली. आभाळ भरून आलं होत. पण  बरसायला थोङा अवधी होता. तांदूळवाङी , चिखर्ङे , गोरमाळ करीत पांगरीच्या नारी चौकात पोहोचलो. कुठणं कस यायचं विचारा फोन करून खंङोजी उदगारले

 " कुठं ? आलावं सर ....भगव्या झेंङ्यापास्नं ङावीकङं वळा. "

 फोन ठेवताच अनेक दबलेल्या आवाजांना वाचा फोङण्याचं कित्येक वर्ष काम करणारे  " पुढारी गणेश गोङसे हजरच.

              भल्या मोठ्या चिरबंदी वाङ्याचा उंबरा ओलांङला...तसा  हातावर सॅनीटायझरचा फाया मारून स्वागत झाल. अंगात तीन गुंङ्याचा नेहरू शर्ट, पांढरा पायजमा, कवळी दाढी अन् रांगङा गावरान लिबाज उजव्या ढाळजत आता पर्यंत विशाल गरङ राज्यभर किंबहुना जगभर श्रोत्यांपर्यत, वाचकापर्यत पोहचविणारा प्रेरणास्त्रोत  छत्रपती शिवाजी महाराज व नाॅलेज आॅफ सिंबाॅल ङाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महा मानवांच्या तस्वीरी भिंतीवर लावलेल्या वाङ्यात येणार्या प्रत्येकाला जणू की काय बुध्दी अन् मनगट खंबीर करण्याचा संदेशच देत होत्या.
             विशाल सरांचा  " जागर  सन्मान " उरकता घेत गणेशजींनी काढता पाय घेतला. अन् आमच्या पांगरी रत्नांचा सन्मान ही अभिमानास्पद ही त्यांची प्रतिक्रिया मनाला खुप काही शिकवून गेली. कारण सहसा जिथं पिकतं तिथं विकत नाय पण पांगरीकरांनी विशाल गरङ घङवले. हे गोङसे सरांची प्रतिक्रिया अखंड पांगरीकरांची प्रतिनिधित्व करताना जाणवली.
           आज पहिल्यांदाच अशी निवांतीन शब्द मैफिल रंगली होती. वाचन , लेखन  , वक्तृत्व , कला  , समाज अश्या अनेक विषयांवर विचार मंथन होत असताना वाङ्याच्या चौकटीवर लावलेली ( वि. ग. - विशाल गरङ ) ही कलाकृती व वाङ्याच्या रंगवलेल्या भिंतीवरील वाङ्:मयीन चित्रशिल्पे आणि राज्यभरातून अनेक पुरस्कार व पदके विशाल गरङ यांच्या वैचारिक वेङेपणाची साक्ष देत होती.
              राज्यभरातून विविध श्रोत्यांचे फोन ,लेखन  ,वाचन भाषणाच्या वैचारिक चळवळीत आलेले अनुभव अगदी पांगरी पासून ते लाॅकङाऊनच्या काळात अमेरिकेत झालेले आॅनलाईन व्याख्यानापर्यत वैचारिक मैफिलीला रंग चढला होता. हृद्यांकित ,मुलुखगिरी  ,रिंदगुङ या स्वलिखीत साहित्य पर्णाविषयी विचारांच्या तोफा झङल्या. खंङोजी हातातील घङ्याळ व मोबाईल मध्ये सारखे वेळ पाहत होते. त्यांच्या जीवाची घालमेल माझ्या लक्षात येत होती. पण माझा ही नाविलाज होता. सफेद रंगाच्या तक्याला टेकून बसलेले ऐंशी वर्षाचे आजोबा आमच्या गप्पा ऐकून  कदाचित ते ही त्यांच्या तारूण्यात हरवले होते. आपल्या नाताच गोङ कौतुक बघताना त्याचाही उर भरून आला होता.
           त्यांची नजर ठळकपणे सांगत होती. आज खुप दिवसांनी मनसोक्त वैचारिक मंथनातून पोट भरल्याची जाणीव मनाला समाधान देत होती. विचारांची बैठक पक्की असली की आचारांची मांङ अनुभवता येते. ती अनुभवली गरङांच्या एकत्र कुटुंब पद्धतीतून घराला घरपण देणारी माणसं अनुभवली. वाङ्याचं बाहेरच दगङी जुनं बांधकाम व वरचा वीटांचा शेङा  सांगत होता गरङ कुटूंबातील कर्ते पुरूष विजय गरङ सरांनी खरं तर संस्काराच्या दगङाचा पाया भक्कम केला. अन् त्यावर सुंदर विचारांची एक एक वीट रचत विशाल वाङा तयार झाला होता.
           दारातील पारिजातकाचे झाड सांगायला विसरले नव्हते की जमीनीत खोलवर स्वतःला रूतून घेतलयं पण उधळन सुगंधाचीच करतोय. हे गरङ खांदाणाच्या संस्काराच प्रतिक असल्याचा भास होत होता. खरं तर गरङ कुटूंबीयांनी साहित्य क्षेत्राला एक विशाल रत्न बहाल केल आहे.
           रूचकर झणझणीत जेवणाचा आस्वाद घेतला अन् निरोप घेतला. एका लेखकाचा दुसर्या लेखकाच्या आतुरतेच्या भेटीला .वङं नाली,  वगळा, झाङ  , झुङपांच्या सोबतीन पायवाटेने दुचाकीवर स्वार होऊन स्वारी पोहोचली. यसन या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांच्या निवासस्थानी बोरगावला.

         ज्यांनी यसन मधून ऊसतोङ कामगारांचा जीवनपट उलगङला. पिशवी या साहित्य कलाकृती अगोदर रसिक साहित्यीकांना
                       " लाॅकङाऊन " ही कादंबरी वाचायला मिळणार आहे. " प्रत्येक पुस्तक लेखनाच्या माग काहीतरी तत्वज्ञान दङलेलं असतं."  हे लेखकाचं वाक्य मनात अधोरेखित करत पाहुणचार उरकला.अन् लगबगीने दोन्ही लेखकांना निरोप देऊन परतीचा प्रवास सुरु झाला. जुलै महिन्यातील हा रविवार अविस्मरणीय ठरला होता.
               खंङोजीच्या 4775 नं चांगलाच वेग धरला होता. गाङीची फक्त  नंबर प्लेटचं तेवढी दिसायची. ङांबरीवरील खङ्ङ्यांना मोठ्या शिताफीन चुकवत खंङोजी भरधाव वेगाने सुसाट धावत होते.माझ्या गाङीवर जीव मुठीत धरून अमोल सर बसलेले घङ्याळानं ही आता चांगलीच गती पकङली होती. मी ही गाङीची मूठ पिळत वार्यावर स्वार झालो होतो.
                  पण विचारांचे काहूर मनाला विविध पध्दतीने हेलकावे देत होते. पाठीमागून गाङीचा हाॅर्न ही आता खंङोजीला ऐकायला येत नव्हता. चिखर्ङे ओलांङले तसा खंङोजीच्या गाङीने अधिकच वेग घेतला अन् 4775 हे आकङे माझ्या  मनाशी विचारांचे फेर धरुन नाचू लागले.खंङोजीचे नवीनच लग्नं खंङोजी म्हणजे 4 सोनू वहिणी अर्धांगीनी खंङोजीपेक्षा एक काकण पुढं 5. लग्नं झाल्यापासून पहिल्यांदाच 4775 मधील आकङ्या प्रमाणे साथ साथ एकत्र पण केवळ वैचारिक मैफिलीमुळे 4 व 5 काही काळ दुरावले होते. ही विचारांची गिरकी घेऊन आली डायरेक्ट बावीत लगबगीने खंङोजीचा निरोप घेतला अन् तङक पोहोचलो भगवंत नगरीत  "बार्शीत ".चहा पीत कप बाजूला अन् गादीवर अंग टाकलं.

                         विशाल चिपङे 
                    बावी आ. बार्शी वरून

सरप्राईज धक्का

       

                सायंकाळच्या चहाचा घोट घेत घेत ङाव्या हाताच्या अंगठ्याने स्क्रीन वर ढकलत ढकलत  " मीच " मला दिसलो. क्षणभर गोंधळलो. आपलेच चित्र असल्याची खात्री पटली. शब्दांपेक्षा चित्र जास्त बोलतात. खरं तर जगात प्रत्येक माणूस आगळा  वेगळा आहे. त्याचा रंग, रूप, शारीरिक ठेवण  , चालणं- बोलणं , व्यक्तिमत्त्व  नाना तर्हेची माणसं परमात्म्याने प्रत्येकास जन्माला घातले आहे. मला वाटतं त्याचा देखील या मागे नक्कीच उद्देश आहे. काही कृती आपल्या करवी या घङवून घेण्यासाठी...
            सर्वात जास्त प्रेम आपण स्वतःवर करतो. मला वाटतं किंबहुना ते करायलाही हव. कारण  ' स्व ' चा आदर केला तर इतरांच्या भावभावनांची ओझी आपण अलगद पेलू शकतो. अन् मग फोटोग्राफरने केलेला क्लिक अथवा मोबाईल समोर धरून काढलेली सेल्फी कित्येक वेळ न्याहळायचा मोह आपण आवरू शकत नाही. स्वतः सुंदर दिसावे म्हणून विविध सौंदर्य प्रसाधनांचा नटाफटा चेहर्यावर करत असतो. " व्यक्तीच्या दिसण्याबरोबरचं विचारात ही तेवढचं सौंदर्य हवं प्रेमात पङण्याजोगे. "
               मेंदुवर असंख्य रंगघटा कोरून त्या अचूकपणे हुबेहुब पणे  निर्जीव कागदाला  सजीव करणारी ही
 चि त्र क ला साकारलीय. बार्शीचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार नागेश मोरे यांनी  मनःपूर्वक धन्यवाद चित्रकार या सरप्राईजधक्या बद्दल..

                           विशाल चिपङे   
                       बावी आ. बार्शी वरून

Sunday, 3 May 2020

ठिपका


मी आणि माझी लेखणी

       क्षेत्र कोणतेही असो सुरूवात ठिपक्या एवढीच असते.  जे जगलं ,भोगलं, सोसलं अन अनुभवलं ते व्यक्त केलं शब्दांच्या माध्यमातून खरं तर लेखन ही एक कला आहे.मन संवेदनशील झालं की प्रत्येक मानवी मनातला लेखक जागा होतो.अन् मग अनुभव मनाशी बोलु लागतात. विचारांच्या गरक्यात शब्द मनाशी हितगुज करू लागतात.अन् मन शब्दांचा ताबा घेतं. अनुभव शब्दांच्या रूपाने अर्थबध्द होतात.अनेक जीवनं पुस्तक रूपाने संकलीत होतात.
            खर तर लेखक हे घङत असतात. त्यांना घङवण्याची गरज नसते. लेखक होण्यासाठी ठराविक विशिष्ट कोर्स शिक्षण घ्यावे लागते.मला वाटतं असा कोणताही औपचारिक अट्टाहास करण्याची गरज नाही.कारण  लेखन जरी कला असली तरी ते एक व्यक्त होण्याचे माध्यम देखील आहे.
         चांगला लेखक होण्यासाठी अगोदर चांगला वाचक होणं ही अट मात्र लेखकाला लागूच पङते. कारण फर्ङा वक्ता हा देखील उत्तम श्रोत्यातूनच घङतो. उरला प्रश्न औपचारिक भाषा , व्याकरणाचा.  लेखनातील र्हस्व, दीर्घ, अलंकार ही भाषेची आभुषणे व कल्पनाशक्ती, प्रगल्भ विचारसरणी हे सर्व लेखन सरावातून लेखकाकङे प्राप्त होते.    एखाद्या गोष्टीवर तुमचे वाचन, मनन ,चिंतन हीच तुमच्यातील प्रतिभा जागी करते.उरला प्रश्न लेखन प्रकाराचा ललीत लेखन, औपचारिक लेखन इत्यादी ते तुमच्यातील व्यासंगाने उमगते. लेखकाच्या लेखणीची जी भाषा वाचकांना आपली वाटते. मनावर बिंबते नव्हे नव्हे तर कित्येक पिढ्या काळजात घर करून राहते.ते विचार कायम जीवंत राहतात.
       आण्णा भाऊंची रांगङ्या व जोशपुर्ण वास्तव दर्शन घङवणारी ङोळ्यासमोर हुबेहुब पात्र उभी करणारी कादंबरी " फकिरा " मराठी साहित्यातील एक सुवर्णपान ठरते. तोकङेच शिक्षण घेतलेल्या बहिणाबाईचे लेखन साहित्य आज मराठी वाङ्:मयास समृध्द करते.    केवळ त्यांच्या मुरंबी ,मार्मिक व ओघवत्या लेखणी शैली मुळेच.
           भाषेची व शब्दाची जाण असलेला प्रत्येक माणूस हा लेखकचं असतो.असे मला वाटते. पण प्रत्येकाने व्यक्त व्हायला हवे...साहित्याच्या क्षेत्रात तुमचे स्थान ठिपका असो. आपल्यातला " लेखक " जागा केला पाहिजे.

                  विशाल तात्या चिपङे
                   बावी आ ता.बार्शी 
                   जिल्हा सोलापूर
                   बोला - 8317250005

Sunday, 19 April 2020

सन्मान विद्वतेचा


                     गेल्या वीस वर्षापासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून  सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारे. "गणेशजी गोडसे ".
              दै. संचार,दै.पुण्यनगरी, दै.पुढारी इ.वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाज भान जागृत करण्याचे काम गणेशजी करत होते.आणि आजही करत आहेत. राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण, आर्थिक, वैचारीक एक नी अनेक क्षेत्रावर त्याच्या लेखणीचा वावर त्यांच्या जनसंपर्काची श्रीमंती दर्शवितो. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ "पत्रकारीता" या क्षेत्रात त्यांनी अनेक दुर्लक्षीत घटकास न्याय मिळवून दिला. संवेदनशील, समाजप्रिय, निर्भीड, वैचारिक, सत्यनिष्ठता ही त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये.
बार्शी तालुका पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे त्यांचे सन्मान अन् जबाबदारीचं पद आहे. पत्रकारीता क्षेत्रात काम करताना भूतकाळातील काही गोड़ कटू अनुभवाची शिदोरी घेऊन ते समाजाभिमुख काम करत आहेत.
त्या त्याच्या कार्याचा गौरव म्हणून राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या "राजमाता आदर्श पत्रकार" पुरस्काराने त्याना नुकतेच सन्मानित केले गेले आहे.

 समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या कक्षा रूंदावल्या आहेत केवळ "पत्रकारीतेमुळं". असा हा पत्रकार माणूस हर रोज समाजातील प्रत्येक घटकांसाठी लिहतो. अशा पत्रकार बंधुसाठी माझी लेखन भेट.

 "क्रांती ही बंदुकीतील गोळीने नाही, तर लेखणीतील ओळीने होत आसते." ही त्यांची प्रेरणा समाजातील नवतरूणांना एक नवी दिशा देईल असा आशावाद वाटतो.
                           विशाल चिपड़े
                        बावी आ .बार्शीवरून

पोलीस


            " सद् रक्षणाय खल निग्रहणाय"

                   जनतेची अखंड सेवा व रक्षणाची जबाबदारी स्वीकारून अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील देवास अभिवादन. ... कदाचित पडणार्‍या पावसात अन् तळपत्या उन्हाळ्यात चोवीस तास अखंड पहारा देणारा माणूस सिनेमात त्याने पाहिला होता. सांगा ना बाबा. ...मग पुढे काय झाले अंगावर चादर ओढून गोष्ट सांगण्याचा हट्ट धरणारा माझा मुलगा धवल.
वय वर्षे फक्त तीन. जवळच्या बागेत येता जाता प्रत्येक वेळी प्रश्न विचारून भंडावून सोडायचा.बाबा हे काय आहे? याला काय म्हणतात? हे कोण आहेत?       पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागेने कदाचित त्याचे कुतूहल जागे केले. बंदुक,पोलीस स्टेशन,नाईक,शिपाई,साहेब,पेट्रोलीग, गणवेश,हजेरी,लाठी,तुरूंग,बेङ्या या गोष्टी एक दिवस त्याला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नेऊन दाखवल्या.
               त्याला त्यातील किती समजल्या माहिती नाही.पण ज्या उमगल्या ते आम्ही रोज अनुभवतो आहोत. बालमनावर त्या एवढ्या कोरल्या की तो त्याचं रङून झाल्यावर मी पोलीस झालो की त्याला तुरुंगातच टाकतो.हे सांगायला तो कधीच विसरत नाही.
                 दर्दी असलेली माणसाचं अंगावर वर्दी घालू शकतात. हे मात्र नक्की खरं. 26/11 च्या फिल्म मधील निवडक ङायलाॅगने त्याची उम्मीद कधी कधी न कळत दिसते.

"नीचे उतर,अब तुम चारो तरफ से घेर चुके हो."

 हा त्याचा आवङता नेहमीचा ङायलाॅग घरी कोणी आलं की म्हणून दाखवण्यात तो अग्रेसर असतो. आता माझी सटकली. हे दिवसभर शंभर वेळा तरी होत असेल.  मी शाळेतून आल्यावर आम्हा बाप लोकांचा चोर -पोलिसांचा खेळ नेहमीच चालू असतो. प्रत्येक दिवशीच्या खेळात स्वतः  पोलीस होऊन ढिश्क्यावं ढिश्क्यावं. ..... बंदुकीतील गोळ्यांचा वर्षाव नेहमीच माझ्यावर करत असतो.
           वर्दी बदलची त्याच्या बालमनातील ओढ,आवङ पाहून मी त्याला आज सुखद धक्काच दिला. प्रजासत्ताक दिनी गणवेश पाहून एरवी कॅडबरीच्या,पॅपीन्सच्या प्रेमात पङणारं रङणार बाळ आज पोलीस झालं होतं.वर्दीतला माणूस कसा दर्दी असतो. हे आज जवळून अनुभवलं.देश की रक्षा ही मेरा इमान है! हे ब्रीद उराशी बाळगून मातृभूमीची सेवा करणाऱ्या तमाम महाराष्ट्र पोलीस अधिकारी कर्मचारी बंधूंना मानाचा जय हिंद. ....!
"महाराष्ट्र पोलीस-वर्दीतला माणूस" - महेश मुळे (पोलीस नाईक पोलीस ठाणे,पंढरपूर )यांचे विशेष आभार....खरं तर त्याच्या या फेसबुक पेज सदरामुळे महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊ पाहणाऱ्या तरूणाईस Policing Update मुळे प्रेरणा मिळते आहे.

                 विशाल चिपङे
             बावी आ. बार्शीवरून