गेल्या वीस वर्षापासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारे. "गणेशजी गोडसे ".
दै. संचार,दै.पुण्यनगरी, दै.पुढारी इ.वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाज भान जागृत करण्याचे काम गणेशजी करत होते.आणि आजही करत आहेत. राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण, आर्थिक, वैचारीक एक नी अनेक क्षेत्रावर त्याच्या लेखणीचा वावर त्यांच्या जनसंपर्काची श्रीमंती दर्शवितो. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ "पत्रकारीता" या क्षेत्रात त्यांनी अनेक दुर्लक्षीत घटकास न्याय मिळवून दिला. संवेदनशील, समाजप्रिय, निर्भीड, वैचारिक, सत्यनिष्ठता ही त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये.
बार्शी तालुका पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे त्यांचे सन्मान अन् जबाबदारीचं पद आहे. पत्रकारीता क्षेत्रात काम करताना भूतकाळातील काही गोड़ कटू अनुभवाची शिदोरी घेऊन ते समाजाभिमुख काम करत आहेत.
त्या त्याच्या कार्याचा गौरव म्हणून राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या "राजमाता आदर्श पत्रकार" पुरस्काराने त्याना नुकतेच सन्मानित केले गेले आहे.
समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या कक्षा रूंदावल्या आहेत केवळ "पत्रकारीतेमुळं". असा हा पत्रकार माणूस हर रोज समाजातील प्रत्येक घटकांसाठी लिहतो. अशा पत्रकार बंधुसाठी माझी लेखन भेट.
"क्रांती ही बंदुकीतील गोळीने नाही, तर लेखणीतील ओळीने होत आसते." ही त्यांची प्रेरणा समाजातील नवतरूणांना एक नवी दिशा देईल असा आशावाद वाटतो.
विशाल चिपड़े
बावी आ .बार्शीवरून
No comments:
Post a Comment