वर्षभरातील ऋतू , हंगाम कालपरत्वे बदलतात.अन् अनुभवयास येतात निसर्गाची नानाविध रुपे कधी रखरखणारा..... उन्हाळा. तर कधी मखमली..... थंडी.तर कधी घसा ओला करणारा पावसाळा.तद्वतं मानवी जीवनाचे चिरंतन तत्व ही असेच,बालपणाची निरागसता,तारुण्याची रंगपंचमी तर वृध्दत्वाचे चटके.
आयुष्याच्या रंगमंचावर ओघानेच वेळ बदलते.पात्र बदलतात.अन् भूमिकाही.बस्स् बदलत्या काळानुसार आम्ही ही बदलायला हव.-"तारूण्य".
मानवी जीवनातील ताजातवाना,रंगभरा,कार्यकर्तृत्वाचा रंगोत्सव म्हणजे तारुण्याची मुसमुसती रग."युवावस्था"
जीवनातील या वसंत ऋतूचा बहर, नवचैतन्य अन् नवपालवी निसर्गाच शृंगारीक रूप.विजयाचं निशाण यशोशिखरावर ठामपणे रोवण्याची वेळ.जगाच्या वैचारिक पटलावर "भारत"हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.शिकागोच्या धर्म षरीषदेत बंधु अन् भगिनींनो उदगारणारे स्वामी विवेकानंद म्हणतात.की तरूणांना तारुण्याची छबी ओळखण्याची नजर हवी. तरच ते तारूण्य देशोपयोगी कार्य करण्यास कार्यप्रवृत्त होते.हे युवाअश्व कोणाच्या रथाचे घोडे बनू नयेत.कारण समाजात लिङरशीप करणारे अन् अनुयायी म्हणून जगणारे दोन प्रवृत्ती पहावयास मिळतात. मग आम्ही तरुणांनी ठरवाव ....लिङरशीप की अनुयायी.
राजेपण सिद्ध करायचे असेल तर मावळेपणाचा राजीनामा द्यावाच लागेल.कारण महाराष्ट्र एकुण तीन फङासाठी प्रसिद्ध आहे ऊसाचा फङ,तमाशाचा फङ अन् कुस्त्याचा फङ. तरुणांनी ठरवाव आम्ही कोणत्या फङात जावं.
विशाल चिपङे
बावी आ. बार्शीवरून
No comments:
Post a Comment