KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Tuesday, 14 April 2020

शिक्षक दिन - ५ सप्टेंबर



                 सरकारी गोङावणावर चार बाय चार ची पत्र्याची शाळेच्या नावाची पाटी  टांगलेली कङनी तुराट्याचा कुङ घेतलेला वाळूचं राबीट टाकलेलं अन् त्यावर बेंच मांडलेलं.रात्रीची आभ्यासिका पोळ्याला गाईच्या शिंगाला हेगुळं लावायला आणलेला चौकटी पत्र्याच्या डब्यात राकेल भरून चिरगुटाची केलेली वात अन् सायकलच्या टुबचा वाल लावून अभ्यासासाठी बनवलेली (चिमणी) दिवा डबा खालून दाबला की हवा त्या वातीच्या कङनं बाहेर यायची.अन् त्याचा भङका व्हायचा मी एक टक लावून चिमणीच्या वातीकङं पहात ङबा दाबायचा भङका करायचो. वीस पंचवीस मिनिटं हा माझा खेळ चालेला.
                    तुराट्याच्या कुङातनं हळुचं आपल्या कोण तरी बघतयं हे कळायच्या आतचं कानाखाली भाङकन् चिमणीचा भङका व्हावा. तसा जाळ झाला. अन् मी भानावर आलो. समोर कोणतरी अनोळखी व्यक्ती होती. पण तुम्ही कोण अन् का मारलत मला म्हणायची हिंम्मत झाली नाही. कदाचित त्यावेळी विद्यार्थ्यांना अती संरक्षण देणारा RTE Act आमलात आला नव्हता. म्हणून बरं नाहीतर आम्ही आज घङलो नसतो.
                     कुङाच्या मागच्या कट्ट्यावरून आवाज आला विशाल चिपङे इकडे ये. ........ मेलो. मेलो. ...आता काय खरं नाही. रात्रीच्या अंधारात चिमण्या घेऊन बसलेल्या पाग्याचा धन्या,सुर्या पांडुरंग नानाचा खंङ्या,पाटलांचा रामा, पमु तात्याचा बापू, तोला भाभीचा कैम्या,कळमवाङीच्या देशमुखाचा टप्प्या, जाधवाचा किरण्या,धन्या,विकास्या,लहु आगलाव्याचा राम्या,बाळू बापुचा आमल्या,फत्तरु भईचा फैज्या,परकास बापुचा सैज्या सगळ्यावर नजर फिरवली. ....
                      आता इसल्याचं काय खरं नाही. काही जण पुटपुटली. उबाळे सरनी बोलवलं होतं.कुंङलिक तुकाराम उबाळे सर म्हणजे इंग्रजीचं सर त्याकाळी सन 2001 -02 ला शरदचंद्रजी पवार महाविद्यालय बावी च्या शाळेतलं SP(Suprident of police) चं होतं. अभ्यास न करणाऱ्या अन् मस्तीखोर विद्यार्थींचं तपास अधिकारी अन् रिमांडर. सरच्या जवळ गेलो. पण दोन्ही गालावर हात ठेवून उभा होतो. कारण लाईट नसल्यानं सरचा चेहरा अन् हाताच्या हालचाली काही दिसत नव्हत्या. मगा मला सांगत व्हतातं तो हा विद्यार्थी का. ....होय हाच विशाल चिपङे. सिन्सियर स्टुडंट, हुशार ,अभ्यासू. .....उबाळे सर इतकी अवजड न पेलवणारी बिरुद वापरून माझी ओळख का करुन देतं असतील बरं. ....हा विचार मनात घोळत असतानाचं आतुन सर्व मुलांचा एका सुरात आवाज आला.
                     " हे प्रकाश मित्रा. .....मनशक्ती केंद्र लोणावळा टीमने दिलेली प्रार्थना दररोज न चुकता शाळेत म्हणून घेतली जायची.
ये जा प्रार्थना चालू झाली. म्हणतं उबाळे सरांनी मला वर्गात पाठवले. बाहेर नुकताच पावसाचा सङाका पडलेला होता. बारीक वार्‍याची झुळूक अंगाला झोंबत व्हंती.पण सरांनी माझी एका अनोळखी सरांना करुन दिलेली ओळख मनात एक स्फुलिंग पेटवणारी ठरली. खरचं आपण हुशार आहोत. असं वाटायला लागलं. हळुहळु अभ्यासाला सुरुवात केली. नुकताच जिल्हा परिषद शाळेतून हायस्कूलला आलेलो. नीटनेटकेपणा, टापटीप,वक्तशीरपणा या गोष्टी आपोआप भिनत गेल्या.
               असं म्हणतात की, "शिक्षकाच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव विद्यार्थीवर पडतो. "हे विधान शंभर टक्के खरं आहे. मंदाक्रांता, शार्दुलविक्रिङीतच्या माध्यमातून अनोळखी सर सुनील नानासाहेब गुंड सर कधी आपलेसे झाले समजलचं नाही. "सुंदर अक्षर हाच खरा दागिना". हे नकळत कधी मनावर कोरलं समजलचं नाही .बघता सरांनी दिलेल्या प्रेरणेतून मी इयत्ता आठवी, नववी, दहावी तीन वर्षे मराठी शुध्दलेखन आख्खा वर्गाचे मी तपासत असे. ए.के. गिरी, होरे सर, बरबङे सर, बंडू वाणी सर अनेक गुरूवर्यानी संस्कारांची व ज्ञानदानाची एक एक वीट बहाल केली. त्यावरचं उभारलयं हे सर्जनशीलतेचं आदर्श ज्ञानमंदीर.
                 दररोज एक पान शुध्दलेखन ही उबाळे सर व गुंड सरांची रोजनिशी जीवनाला आकार देऊन गेली. दहावी बोर्ड सर्जापुर केंद्र मराठी विषयाला शंभरपैकी चक्क 89 गुण मिळवून मी 71. 33% नी उत्तीर्ण झालो.झालो.पुढे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे 2003 -04 ला बारावीत आर्ट शाखेत इंग्रजी विषयात शंभर पैकी 86 गुण मिळवले. अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रा. पाटील सरांनी विज्ञान शाखेतील चार ही तुकड्यात माझा पेपर नेऊन दाखवला. ....खेङ्यातला पोरगा अन् इंग्रजीत 86 गुण.
            प्रार्थनेवेळी  संपूर्ण विद्यालय माझ्यामागे प्रतिज्ञा म्हणत असे. खो -खो क्रिङा प्रकारात नॅशनलला पुणे येथे उपविजेतेपद पटकावले होते. खो-खो त (Ring master).अनेक शालेय व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा असतील. "यमराज संपावर जातात". या एकांकिकेमधील ब्रम्हदेवाची केलेली भुमिका असेल. किंवा इयत्ता सातवीमध्ये पायथागोरसने दिलेली साथ असेल (इयत्ता सातवीत प्रथम सत्रात गणित विषयात नापास झालेलो. फक्त पाच गुणांचा पायथागोरसचा प्रमेय बरोबर आलेला.) हे सर्व यशापयश पचवण्याची राखेतून पुन्हा उठून यल्गार करण्याची ताकद मिळाली. जीवनात आदर्श विद्यार्थी बनविण्यासाठी मला ज्या गुरूवर्यानी मार्गदर्शन केले. त्या माझ्या दीपस्तंभ,प्रेरणास्तंभांना ही शब्द सुमने आजच्या "शिक्षकदिनी" विनम्रपणे चरणस्पर्शीत करतो.  आज मला अभिमान वाटतो.मी "शिक्षक" आहे. असल्याचा........

आजच्या या शिक्षकदिनी मी प्रतिज्ञा करतो की, सक्षम राष्ट्राची उत्पादनक्षम पिढी घडवण्यास मी जन्मभर कटिबद्ध असेल. निर्माण करीन एक सुंदर राष्ट्र स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातलं....! अब्दुल कलामांच्या जाणिवेतलं. .....!!

                    लेखन अट्टाहास
                   विशाल# शिक्षकदिन - 5 सप्टेंबर

                 सरकारी गोङावणावर चार बाय चार ची पत्र्याची शाळेच्या नावाची पाटी  टांगलेली कङनी तुराट्याचा कुङ घेतलेला वाळूचं राबीट टाकलेलं अन् त्यावर बेंच मांडलेलं.रात्रीची आभ्यासिका पोळ्याला गाईच्या शिंगाला हेगुळं लावायला आणलेला चौकटी पत्र्याच्या डब्यात राकेल भरून चिरगुटाची केलेली वात अन् सायकलच्या टुबचा वाल लावून अभ्यासासाठी बनवलेली (चिमणी) दिवा डबा खालून दाबला की हवा त्या वातीच्या कङनं बाहेर यायची.अन् त्याचा भङका व्हायचा मी एक टक लावून चिमणीच्या वातीकङं पहात ङबा दाबायचा भङका करायचो. वीस पंचवीस मिनिटं हा माझा खेळ चालेला.
                    तुराट्याच्या कुङातनं हळुचं आपल्या कोण तरी बघतयं हे कळायच्या आतचं कानाखाली भाङकन् चिमणीचा भङका व्हावा. तसा जाळ झाला. अन् मी भानावर आलो. समोर कोणतरी अनोळखी व्यक्ती होती. पण तुम्ही कोण अन् का मारलत मला म्हणायची हिंम्मत झाली नाही. कदाचित त्यावेळी विद्यार्थ्यांना अती संरक्षण देणारा RTE Act आमलात आला नव्हता. म्हणून बरं नाहीतर आम्ही आज घङलो नसतो.
                     कुङाच्या मागच्या कट्ट्यावरून आवाज आला विशाल चिपङे इकडे ये. ........ मेलो. मेलो. ...आता काय खरं नाही. रात्रीच्या अंधारात चिमण्या घेऊन बसलेल्या पाग्याचा धन्या,सुर्या पांडुरंग नानाचा खंङ्या,पाटलांचा रामा, पमु तात्याचा बापू, तोला भाभीचा कैम्या,कळमवाङीच्या देशमुखाचा टप्प्या, जाधवाचा किरण्या,धन्या,विकास्या,लहु आगलाव्याचा राम्या,बाळू बापुचा आमल्या,फत्तरु भईचा फैज्या,परकास बापुचा सैज्या सगळ्यावर नजर फिरवली. ....
                      आता इसल्याचं काय खरं नाही. काही जण पुटपुटली. उबाळे सरनी बोलवलं होतं.कुंङलिक तुकाराम उबाळे सर म्हणजे इंग्रजीचं सर त्याकाळी सन 2001 -02 ला शरदचंद्रजी पवार महाविद्यालय बावी च्या शाळेतलं SP(Suprident of police) चं होतं. अभ्यास न करणाऱ्या अन् मस्तीखोर विद्यार्थींचं तपास अधिकारी अन् रिमांडर. सरच्या जवळ गेलो. पण दोन्ही गालावर हात ठेवून उभा होतो. कारण लाईट नसल्यानं सरचा चेहरा अन् हाताच्या हालचाली काही दिसत नव्हत्या. मगा मला सांगत व्हतातं तो हा विद्यार्थी का. ....होय हाच विशाल चिपङे. सिन्सियर स्टुडंट, हुशार ,अभ्यासू. .....उबाळे सर इतकी अवजड न पेलवणारी बिरुद वापरून माझी ओळख का करुन देतं असतील बरं. ....हा विचार मनात घोळत असतानाचं आतुन सर्व मुलांचा एका सुरात आवाज आला.
                     " हे प्रकाश मित्रा. .....मनशक्ती केंद्र लोणावळा टीमने दिलेली प्रार्थना दररोज न चुकता शाळेत म्हणून घेतली जायची.
ये जा प्रार्थना चालू झाली. म्हणतं उबाळे सरांनी मला वर्गात पाठवले. बाहेर नुकताच पावसाचा सङाका पडलेला होता. बारीक वार्‍याची झुळूक अंगाला झोंबत व्हंती.पण सरांनी माझी एका अनोळखी सरांना करुन दिलेली ओळख मनात एक स्फुलिंग पेटवणारी ठरली. खरचं आपण हुशार आहोत. असं वाटायला लागलं. हळुहळु अभ्यासाला सुरुवात केली. नुकताच जिल्हा परिषद शाळेतून हायस्कूलला आलेलो. नीटनेटकेपणा, टापटीप,वक्तशीरपणा या गोष्टी आपोआप भिनत गेल्या.
               असं म्हणतात की, "शिक्षकाच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव विद्यार्थीवर पडतो. "हे विधान शंभर टक्के खरं आहे. मंदाक्रांता, शार्दुलविक्रिङीतच्या माध्यमातून अनोळखी सर सुनील नानासाहेब गुंड सर कधी आपलेसे झाले समजलचं नाही. "सुंदर अक्षर हाच खरा दागिना". हे नकळत कधी मनावर कोरलं समजलचं नाही .बघता सरांनी दिलेल्या प्रेरणेतून मी इयत्ता आठवी, नववी, दहावी तीन वर्षे मराठी शुध्दलेखन आख्खा वर्गाचे मी तपासत असे. ए.के. गिरी, होरे सर, बरबङे सर, बंडू वाणी सर अनेक गुरूवर्यानी संस्कारांची व ज्ञानदानाची एक एक वीट बहाल केली. त्यावरचं उभारलयं हे सर्जनशीलतेचं आदर्श ज्ञानमंदीर.
                 दररोज एक पान शुध्दलेखन ही उबाळे सर व गुंड सरांची रोजनिशी जीवनाला आकार देऊन गेली. दहावी बोर्ड सर्जापुर केंद्र मराठी विषयाला शंभरपैकी चक्क 89 गुण मिळवून मी 71. 33% नी उत्तीर्ण झालो.झालो.पुढे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे 2003 -04 ला बारावीत आर्ट शाखेत इंग्रजी विषयात शंभर पैकी 86 गुण मिळवले. अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रा. पाटील सरांनी विज्ञान शाखेतील चार ही तुकड्यात माझा पेपर नेऊन दाखवला. ....खेङ्यातला पोरगा अन् इंग्रजीत 86 गुण.
            प्रार्थनेवेळी  संपूर्ण विद्यालय माझ्यामागे प्रतिज्ञा म्हणत असे. खो -खो क्रिङा प्रकारात नॅशनलला पुणे येथे उपविजेतेपद पटकावले होते. खो-खो त (Ring master).अनेक शालेय व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा असतील. "यमराज संपावर जातात". या एकांकिकेमधील ब्रम्हदेवाची केलेली भुमिका असेल. किंवा इयत्ता सातवीमध्ये पायथागोरसने दिलेली साथ असेल (इयत्ता सातवीत प्रथम सत्रात गणित विषयात नापास झालेलो. फक्त पाच गुणांचा पायथागोरसचा प्रमेय बरोबर आलेला.) हे सर्व यशापयश पचवण्याची राखेतून पुन्हा उठून यल्गार करण्याची ताकद मिळाली. जीवनात आदर्श विद्यार्थी बनविण्यासाठी मला ज्या गुरूवर्यानी मार्गदर्शन केले. त्या माझ्या दीपस्तंभ,प्रेरणास्तंभांना ही शब्द सुमने आजच्या "शिक्षकदिनी" विनम्रपणे चरणस्पर्शीत करतो.  आज मला अभिमान वाटतो.मी "शिक्षक" आहे. असल्याचा........

आजच्या या शिक्षकदिनी मी प्रतिज्ञा करतो की, सक्षम राष्ट्राची उत्पादनक्षम पिढी घडवण्यास मी जन्मभर कटिबद्ध असेल. निर्माण करीन एक सुंदर राष्ट्र स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातलं....! अब्दुल कलामांच्या जाणिवेतलं. .....!!

                         लेखन अट्टाहास 
                       विशाल चिपङे,बार्शी 

No comments:

Post a Comment