KNOWLEDGE CREATION ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday, 15 April 2020

प्रेरणापीठ - माईचं स्नेहग्राम


       रात्र दिवस माणूस जीवनाच्या बेरजेची गणित करण्यात दंग असतो. फायदा, नफा, स्वार्थ, सुख, ऐशो आराम, बंगला, गाङी, नोकर चाकर,पैसा यात गुरफटलेले मानवी आयुष्य स्वतःसाठी अन् कुटुंबासाठी आयुष्यभर राबतो. अन् मागच्या पिढीच्या भविष्यासाठी वर्तमान पणास लावतो. जगला काय? अन् मेला काय?.........

    खरं तर जीवनाचा सार कळलेली माणसच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर समाजाभिमुख काम करून आदर्शाचा दीपस्तंभ उभा करतात. उन्हाचा तडाखा वाढतच होता.सुर्य आग ओकत होता. कोरफळे मार्गे पानगाव गाठण्याचा विचार मनात घोळत असतानाच आपसूकचं गाङीचा हॅन्डल पानगावच्या दिशेने वळाला. तापलेली ङांबरी सङक अन् गाङीचं गरम झालेलं इंजिन पायाला भट्टीचा अनुभव देत होते. आख्खा माळ खायला उठल्याचा भास होत होता. माळावरची वाळलेली कुसळं मनाला बोचत होती. तर मोठ मोठी दगङं दुरवरणं म्हशी बसल्याचा भास करून देत होती. गाङीचा ब्रेक दाबत दाबत वळण घेतल. अन् अवघ्या विश्वाला स्वतः तळपत राहून प्रकाशाचं दान देणार्‍या सूर्याच्या प्रखर प्रतिमेत लांबवर उनाड माळावर मनाला प्रसन्नतेची उभारी देणारी परसबाग मोठ्या थाटात त्या खङकात जिद्द अन् सामर्थ्यानं स्वतःच्या आस्तित्वाची जाणीव करून देत होती. तशी गाङीची मुठ वङली.  अन् बघता बघता पोहचलो स्नेहग्रामच्या प्रांगणात......
           मनाला कार्यप्रेरीत करणारा नयन मनोहारी परीसर खरं तर उन्हाळ्याच्या विसर पाङून गेला. महेश दादा अन् विनया माईच्या या स्नेहग्राम मध्ये मी पोहोचलो होतो. दु:खी,वंचित,अनाथ पिङीत पालावर राहणाऱ्या कुटुंबात पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेली ही बालकं नियती यांच्या बरोबर खरं तर जीवघेणी अशिक्षितपणाचा खेळ खेळत होती. पण दादा अन् माईच्या कृपाछत्राखाली आयुष्याच्या पाटीवरील मुळाक्षरे मोठ्या जिद्दीने आणि ठळकपणे गिरवत आहेत. आजच्या आधुनिक युगात प्राथमिक शिक्षकाचा राजीनामा देऊन धारण केलेले सेवाव्रत समाजाला खुप काही शिकवून जाते.खरं तर बंगला, गाडी, पिकणीक अन् दागिण्याच्या मोहात अडकलेली आजची स्त्री. यात अडकून न पङता अनाथांची माई होते. अन् मायेची उभारी देते. कृष्ठरोग्याच्या बोथटलेल्या तळहातावर बाबांना स्वर्ग गवसला.तद्वतं दादा अन् माईना वंचिताच्या हातात शिक्षणाची पाटी देण्याचा सुर गवसला. 
              संख्यात्मक पेक्षा गुणात्मकतेला महत्व देणारी ही लोकशाही शाळा. मुलांना आकलनात्मक व उपयोजपुर्ण निसर्गाच्या सान्निध्यात उद्याच्या राष्ट्राची उत्पादनक्षम सक्षम पिढी घडवत आहे.आठवणीतील झाङ,पाण्याची बचत,कमी गरजा-मोठे काम,स्वयंपूर्ण शिक्षण,स्वावलंबन,लहान व मोठ्याप्रती आदराची भावना या सार्‍या गोष्टी बाबांच्या आनंदवनाची आठवण करून देतात. 
       
"सार्‍या कोवळ्या जीवांना अक्षराचा स्पर्श व्हावा!!
        उजेङाचं दान देण्या झोपडीत सुर्य यावा!!
             सार्‍या वंचित हातात ठेवू अक्षरांचे दिवे!!
             आणि तृषार्त ओठात प्रकाशाचे गीत नवे! !

 जीवनाचा अर्थ कळण्यासाठी,जिद्दी प्रवास अनुभवण्यासाठी,देवाच्या भेटीसाठी अवश्य भेट द्या.दादा व माईच्या स्नेहग्रामला ,कोरफळे ता.बार्शी जि. सोलापूर .

                     विशाल चिपङे 
                  जागर फाऊंडेशन
              बावी आ.बार्शी सोलापूर

No comments:

Post a Comment